• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अवकाळी पावसामुळे राज्यातील दोन लाख हेक्टरवरील पिकांची माती; नुकसानीचे पंचनामे पूर्ण

by Yes News Marathi
April 5, 2023
in मुख्य बातमी
0
अवकाळी पावसामुळे राज्यातील दोन लाख हेक्टरवरील पिकांची माती; नुकसानीचे पंचनामे पूर्ण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. तर फळबागांचे देखील नुकसान झाले. तर राज्यभरातील 1 लाख 99 हजार 486 हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. दरम्यान, या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, नुकसानभरपाईसंदर्भात जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आता नुकसानभरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून ऑनलाईन माहिती अपलोड करण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागला आहे. त्यामुळे अशीच काही परिस्थिती आता अवकाळीच्या नुकसानभरपाई बाबत होऊ नयेत अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आधी झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मार्च महिन्यात देखील दोनदा अवकाळी पावसाचा सामना करावा लागला. ज्यात 4 ते 9 मार्च आणि 15 ते 21 मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे कडधान्य, फळ पिके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, इत्यादी पिकांचे नुकसान झाले. तर राज्यभरातील 1 लाख 99 हजार 486 हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. तर या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले आहे.
सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात
मराठवाड्यात 1 मार्च ते 20 मार्च दरम्यान 11 लाख 7 हजार 5 शेतकऱ्यांचं 60 हजार 258 हेक्टरवर नुकसान झाले आहेत. ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, 23 हजार 821 हेक्टरवरील पिकांची माती झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, जालना या जिल्ह्यात देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. तर मराठवाड्यातील 99 टक्के पंचनामे झाले आहेत. त्यामुळे आता नुकसानभरपाई कधी मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर याकडे शेतकरी नजरा लावून बसले आहे.
राज्यातील नुकसान आकडेवारी….
अ.क्र. जिल्ह्याचे नाव नुकसान आकडेवारी
1 ठाणे 398
2 पालघर 4,377
3 रायगड 598
4 सिंधुदुर्ग 43
5 नाशिक 11,875
6 धुळे 9,522
7 नंदुरबार 3,052
8 जळगाव 11,491
9 अहमदनगर 12,198
10 पुणे 579
11 सोलापूर 3,977
12 सातारा 484
13 सांगली 1
14 छत्रपती संभाजीनगर 23,914
15 बीड 16,942
16 जालना 15,080
17 परभणी 6,812
18 हिंगोली 5,604
19 लातूर 11,795
20 नांदेड 23,821
21 धाराशिव 1,526
22 बुलडाणा 3,147
23 वाशीम 4,981
24 अमरावती 9,058
25 यवतमाळ 6,539
26 अकोला 3,562
27 वर्धा 86
28 गोंदिया 142
29 भंडारा 227
30 चंद्रपुर 221
31 गडचिरोली 246
32 नागपूर 7,188

Previous Post

भिजलेले काडतूस महाराष्ट्राने खूप पाहिले, सीबीआय, ईडी बाजूला ठेवा मग… संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

Next Post

‘या’ युरोपियन देशात कामगार मिळत नाहीत, चार लाख नोकऱ्या रिक्त; आता भारताला घातलं साकडं

Next Post
‘या’ युरोपियन देशात कामगार मिळत नाहीत, चार लाख नोकऱ्या रिक्त; आता भारताला घातलं साकडं

'या' युरोपियन देशात कामगार मिळत नाहीत, चार लाख नोकऱ्या रिक्त; आता भारताला घातलं साकडं

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group