येस न्युज मराठी नेटवर्क : सध्या कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व काम धंदा बंद असल्याने रोजगार बंद झाल्याने त्यामुळे गोरगरीब व अन्यथा लोकांच्या हाताचे काम बंद असल्याने त्यांचे दैनंदिन जीवन जगणे अशक्य झाले आहे. आव्हादा फाउंडेशन व मित्तल ग्रुप मुंबई यांच्याकडे अशा गरजू गोरगरीब लोकांच्या उपजिवेकरीता धान्य वाटप करण्यात आले. यासाठी डोणगावंचे सुपुत्र आयुष्यमान सुखदेव, आप्पाराव पाटील यांच्या सहकार्याने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी उत्तर सोलापूर सरचिटणीस विठ्ठल वाघमारे व राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शाखा डोणगाव विशाल धाकतोडे, अभिमान शिंदे, माराप्पा साबळे, विलास धाकतोडे, सचिन वाघमारे, नामदेव कसबे ,युवराज वाघमारे ,माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष धाकतोडे ,अशोक वाघमारे आदी उपस्थित होते.