मुंबई : देशभरात हिजाबवरुन राजकारण तापले असताना आता मुंबईतील एका कॉलेजमध्ये बुरखा बंदी करण्यात आली आहे. माटुंगा येथील एम.पी. शहा या कॉलेजने बुरखा बंदीचा निर्णय घेतल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. ऐकीकडे देशात हिजाबवरुन वातावरण बिघडले असताना मुंबईतील कॉलेजमध्ये बुरखा बंदी केल्याने राज्यातील राजकारण देखील तापण्याची शक्यता आहे.
कर्नाटकामधील हिजाबवरुन देशभरात निषेध होत असताना आता माटुंग्याच्या कॉलेजमध्ये बुरखाबंदी केल्याने राजकारण पेटण्याची शक्यता आहे. एम.पी. शहा कॉलेजने बुरखाबंदी केल्याचा आरोप आमदार रईस शेख यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहले आहे. एम.पी. कॉलेजने आपल्या अधिकृत वेबसाईटवर देखील बुरखाबंदी केल्याचा खळबळजनक आरोप रईस शेख यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.