येस न्युज मराठी नेटवर्क : कर्करोग रुग्णांच्या नातेवाईंकांना देण्यात आलेल्या घरांचे स्थान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलल्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड कमीलीचे नाराज झाले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार जितेंद्र आव्हाड यांनी देंवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतली आहे. दोघांच्या भेटीचे कारण काय होतं? हे गुलदसत्यातच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठींना फार महत्वं आलं असतानाच आव्हाड फडणवीस यांची भेटही गाजण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची उद्धव ठाकरे यांना पुसटशीही कल्पना नसल्यामळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.शिवडीचे आमदार आजय चौधरी यांना महत्व दिल्यामुळे जितेंद्र आव्हाड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.