• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

२०१९ ला सरकारने केली तशी मदत करण्याची मागणी : फडणवीस

by Yes News Marathi
July 30, 2021
in इतर घडामोडी
0
२०१९ ला सरकारने केली तशी मदत करण्याची मागणी : फडणवीस
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागातील तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या चिखली गावात देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. २०१९ साली जशी मदत झाली तशी मदत यावेळी झाली पाहिजे, अशी मागणी लोकांकडून करण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

२०१९ मध्ये आलेल्या महापूराने प्रचंड नुकसान झाले होते . मी आणि चंद्रकांत दादांनी तातडीने निर्णय घेत ५ हजार रोखीने १० हजार बॅंक खात्यामध्ये छोट्या दुकानदारांना ५० हजार रुपये, जनावरांचे नुकसान असेल तर त्याला २० हजार रुपये तसेच घरांच्या पडझडीसाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला. शेतकरी असेल शेतमजूर असेल किंवा छोटा व्यावसायिक असेल या सर्वांना आपण विनाविलंब मदत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रत्येक भागातून २०१९ साली जशी मदत झाली तशी मदत यावेळी झाली पाहिजे अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ मदत जाहीर केली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.“अलमट्टी आणि राधानगरीच्या विसर्गाचा प्रॉब्लेम आलेला नाही आणि पाऊसही केवळ तीन दिवस पडलेला आहे. त्यामुळे अशा परिस्थिती आपण जलमय होत असू तर कुठेतरी याचा नीट अभ्यास करुन याच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. १० – १५ वर्षांनी येणारी आपत्ती वर्षाने यायला लागली तर लोकांच जगण मुश्किल होईल. त्यामुळे हे पाणी वळवून मराठवाडा आणि इतर दुष्काळी भागामध्ये देण्याच्या संदर्भात आराखडा आम्ही मान्य केला होता आणि जागतिक बँकेने यासाठी निधी देण्याचे मान्य केले होते . दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर हे पुढे जाऊ शकलेले नाही. यावर उपाययोजना करायची असेल तर या पाण्याचा निचरा आपण बोगद्यांच्या माध्यमातून करत नाही तोपर्यंत हे पाणी साचत जाईल आणि आपल्याला अडचणींचा सामना करावा लागेल, असे फडणवीस म्हणाले.

Previous Post

केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद

Next Post

महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल आता ऑगस्टमध्येच

Next Post
महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल आता ऑगस्टमध्येच

महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल आता ऑगस्टमध्येच

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group