येस न्युज मराठी नेटवर्क ; आठ ते दहा महिन्यांनंतर राज्यातील ठप्प झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाचे संकट पुन्हा गडद होताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख महानगरांसह काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा उद्रेक झाल्याचं आकडेवारीतून समोर आलं असून, आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहे. पुण्यासह अनेक शहरांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबादबरोबर विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्येही करोनाने डोके वर काढले आहे. इतर जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून, राज्य सरकारकडून नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे व खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते आहे.नागरिकांकडून सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे.
तीन जिल्हयात नाईट कर्फ्यू ?
विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातही करोनाचा उद्रेक झाला असून, राज्य सरकार या तीन जिल्ह्यांत नाईट कर्फ्य लागू करण्याचा विचार करत आहे.