• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 14, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अधिकारी, व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ; व्यापारी आंदोलनावर ठाम

by Yes News Marathi
August 16, 2021
in इतर घडामोडी
0
अधिकारी, व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ; व्यापारी आंदोलनावर ठाम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 पंढरपूर -  संचारबंदीला  पंढरपूर व्यापारी महासंघाकडून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली. पंढरपुरातील व्यापाऱ्यांच्या भावना जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासमोर मांडणार असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले.

    कोरोना साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यात जिल्हा प्रशासनाकडून 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू केली आहे. कोरोनामुळे पंढरपुरातील व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती मंदावली आहे. त्यातून आता पंढरपुरात होणाऱ्या संचारबंदीला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रेटही कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने संचारबंदीबाबत फेरविचार करावा. अन्यथा 13 ऑगस्टपासून दुकाने उघडण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला. मात्र, अधिकारी व व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे . प्रतिक्रिया देताना अप्पर जिल्हाधिकारी आणि व्यापारी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, या चर्चेमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. अप्पर जिल्हाधिकारी व व्यापारी प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीबाबत योग्य ती भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांच्या भावना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सांगितले. याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले आहे.

Previous Post

सोलापूर विभागातील 3 हजार 900 एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनाची प्रतीक्षा

Next Post

कार्यकर्त्यांच्या अंगार-भंगार घोषणामुळे पंकजा मुंडे संतापल्या

Next Post
कार्यकर्त्यांच्या अंगार-भंगार घोषणामुळे पंकजा मुंडे  संतापल्या

कार्यकर्त्यांच्या अंगार-भंगार घोषणामुळे पंकजा मुंडे संतापल्या

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group