येस न्युज मराठी नेटवर्क । सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस पदोन्नत्या व बदल्यांमधील भ्रष्टाचारावर पांघरुण घातले गेल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे पुरावे सादर करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांनी संबंधितांचे दूरध्वनी टॅप करून पुरावे गोळा केले आणि महासंचालकांमार्फत २५ ऑगस्ट २०२० मध्ये सरकारला अहवाल देऊनही मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांचं मौन चिंताजनक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.