• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, July 22, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज हे मोगलांना लाच देऊन आग्र्याहून सुटले- राहुल सोलापूरकर….

by Yes News Marathi
January 30, 2025
in इतर घडामोडी
0
छत्रपती शिवाजी महाराज हे मोगलांना लाच देऊन आग्र्याहून सुटले- राहुल सोलापूरकर….
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती शिवाजी महाराज हे मोगलांना लाच देऊन आग्र्याहून सुटले होते. तेव्हा मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते, असा दावा छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते राहुल सोलापूर यांनी केला. या दाव्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेता किरण माने यांनी राहुल सोलापूरकरांचा खरपूस समाचार घेत सुनावले. असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतले शेण तसेच आहे. अशा शब्दांत किरण माने यांनी ताशेरे ओढले.

अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेबाबत बरेच वादग्रस्त दावे केलेत. औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिल्याचे ते म्हणालेत. सोलापूरकरांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटल्याचे पाहायला मिळाले. अभिनेते किरण माने यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सोलापूरकर यांच्यावर सडेतोड टीका केली.

काय म्हणाले किरण माने?

अशाप्रकारच्या लोकांनी आपली मराठी इंडस्ट्री खच्चून भरलेली आहे! असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतले शेण तसेच आहे. विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेणाऱ्या एका इतिहासद्रोह्यालाही याने खोटे ठरवले, असा घणाघातच किरण माने यांनी केला.
अरे, ‘लाच’ दिली होती का नव्हती हे दूरच… पण लाच दिल्याचे कधी पुरावे असतात का? असा सवालही त्यांनी केला. कडेकोट बंदोबस्तात तुरुंगात असताना महाराज पैसे चारतात आणि त्यांना ‘लाच दिली’ असे अधिकृत शिक्क्याचे परवाने मिळतात, असा अनागोंदी कारभार चालायला ते ईव्हिएम घोटाळ्याने सत्तेत आलेले सरकार होते की काय? असाही प्रश्न किरण माने यांनी विचारला.

राहुल सोलापूरकर यांचा वादग्रस्त दावा काय?

अभिनेता राहुल सोलापूर यांनी नुकतीच ‘मु.पो. मनोरंजन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी ‘महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले महाराज… आणि त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली. त्याचे मोहसीन की मोईम खान नाव आहे. त्याच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन महाराज बाहेर पडले. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले, त्याच्या परवान्याची अजुनही खूण सुद्धा आहे.’ असा वादग्रस्त दावा केला.
राहुल सोलापूरकर यांनी पुढे बोलताना ‘गोष्टीरुपात सांगताना लोकांना रंजक करुन सांगावे लागते, मग ती रंजकता आली की, इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो किंवा इतिहास बाजूला ठेवला जातो.’ असाही दावा केला

Previous Post

मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित ; मागण्यांसदर्भात लवकरच निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन राजधानी मुंबईत करणार ….

Next Post

सामान्य नागरिकांनी तृतीयपंथीयांना स्वीकारून आपल्यात सामावून घ्यावे-डॉ.पल्लवी गुहा

Next Post
सामान्य नागरिकांनी तृतीयपंथीयांना स्वीकारून आपल्यात सामावून घ्यावे-डॉ.पल्लवी गुहा

सामान्य नागरिकांनी तृतीयपंथीयांना स्वीकारून आपल्यात सामावून घ्यावे-डॉ.पल्लवी गुहा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group