मुंबई : भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टीका केली होती. जन आशीर्वाद यात्रा काढा की कुठल्याही यात्रा काढा जनतेचे आशीर्वाद आम्हालाच आहे, असं राऊत म्हणाले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास कोल्हापुरी शैलीतच राऊतांचा समाचार घेतला. आरं बाबा, ज्याची तुला भीती नाही ते वारंवार कशाला बोलतो. तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
भाजपच्या दोन नेतृत्वाने देशाला विकले या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. या देशाच्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की, कोणी कोणाला काही म्हणू शकतो. त्यामुळे वडेट्टीवार यांचे ते मत आहे. शेवटी राजकारणात कुणाला मत मिळत, कुणाच सरकार येत यावर ठरत असत. तुमच सरकार काही लोकांनी मत देऊन आलेल नाही. तुम्ही गिमिक करून सत्तेत आला आहात. मोदी लोकांनी मत दिल्याने आले आहेत. तुम्ही मोदींवर बोलून काय होतंय, असा चिमटा त्यांनी काढला. वडेट्टीवार हे देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे आपल मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. मोदींनी देशाला पुढे नेल की खड्ड्यात घातले हे लोक ठरवतील. मतपेट्यातून ते दिसतच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.हा रुटीन दौरा होता. आम्ही वारंवार दिल्लीत जातो. नेक्स्ट जनरेशन उभी केली पाहिजे या हेतूने आमचे काम चालत. त्यामुळे राम शिंदे, संजय कुंटे, चंद्रशेखर बावनकुळे आदी सर्वांना घेऊन आम्ही दिल्लीत गेलो. मंत्र्यांना भेटण आणि खाते समजून घेण्यासाठी हा दौरा होता. मोदी-शहांची भेट सोडली तर सर्वांची भेट झाली. अधिवेशनामुळे मोदी आणि शहांची भेट होऊ शकली नाही, असे सांगतानाच या दौऱ्याचा आणि राज्यातील सत्तांतराचा काहीच संबंध नाही, अस त्यांनी स्पष्ट केले .