सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कोवीड-19 आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाला 50 हजार सानुग्रह सहाय्य राज्य शासनामार्फत देण्यात येते. 20 मार्च 2022 पासून पुढे कोरोनाने मृत्यू झालेल्या नातेवाईकांना अर्ज करण्यास तिथून पुढे 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर तक्रार निवारण समितीमार्फत अर्ज करावेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शमा पवार यांनी दिली.
कोवीड-19 या आजारामुळे 20 मार्च 2022 पूर्वी मृत्यू झालेला असल्यास 24 मार्च 2022 पासून 60 दिवसाच्या आत म्हणजे 24 मे 2022 पर्यंत आणि 20 मार्च 2022 पासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्यूच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत या योजनेखाली अर्ज करावेत.
मुदतीच्या नंतरचे अर्ज तक्रार निवारण समिती (GRC) मार्फत करता येतील. या योजनेसाठी ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे, त्यांच्याविरुध्द जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या कलम 52 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.