पुणे: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं नेमलेल्या आयोगाचं कामकाज लवकरच सुरू होणार आहे. या प्रकरणी काही लोकांचे जबाब नोंदवले जाणार असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.
चौकशी समितीचे वकील आशिष सातपुते यांनी ‘एएनआय’ला ही माहिती दिली. त्यानुसार, येत्या २ ऑगस्टपासून चौकशी आयोग साक्षी नोंदवण्याचे काम सुरू करणार आहे. शरद पवार यांनाही जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले जाईल, असे त्यांनी सांगितले .१ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते.