• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अरणऋषी मारुती चितमपल्ली यांना विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार प्रदान

by Yes News Marathi
August 1, 2021
in इतर घडामोडी
0
अरणऋषी मारुती चितमपल्ली यांना विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार प्रदान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पुरस्कारांचे वितरण
सोलापूर – भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा शिक्षणाचा हेतू नोकरदार घडविणे हा होता. मात्र आताच्या काळात उद्योजक घडवणे आणि त्यापेक्षाही पुढे जाऊन उत्कृष्टता निर्माण करणे हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे, त्यादृष्टीने विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना घडविले पाहिजे, अशी अपेक्षा भारतीय विश्वविद्यालय संघाचे अध्यक्ष कर्नल तिरुवसगम यांनी व्यक्त केली.रविवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 17 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

डॉ. तिरुवसगम पुढे म्हणाले, केवळ एक-दोन महान व्यक्ती निर्माण करून कधी देशाचा विकास होत नसतो, असे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम म्हणत असत. त्यानुसार देशाचा विकास होण्यासाठी  विद्यापीठांनी  सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि जीवनात स्तर उंचावण्याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने शिक्षण, संशोधन या क्षेत्रात चांगली प्रगती केली असून हे विद्यापीठ आता देशस्तरावर नावारूपाला आलेले आहे, असे कौतुक करून कर्नल तिरुवसगम म्हणाले की, सध्याच्या काळात नवे शैक्षणिक धोरण आलेले आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपणाला भारतीय दृष्टीकोनातून शिक्षण देण्याची व विद्यार्थी घडविण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने आनंद व्यक्त केला. माळढोकच्या नान्नज अभयारण्यात नर-मादीच्या जोड्या असल्याशिवाय पक्षांची संख्या वाढणार नाही. त्याचबरोबर किमान दहा ते पंधरा नर-मादी येथे असणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, आपले विद्यापीठ सध्या महाराष्ट्रात चांगली कामगिरी करते आहे. या विद्यापीठातील, शिक्षक अधिकारी, अधिकार मंडळाचे सदस्य या सर्वांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे. सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. विद्या लेंडवे यांनी केले. तंत्र साहाय्य डॉ. श्रीराम राऊत आणि प्रा. चंद्रकांत गार्डी यांचे लाभले.

यांचा झाला पुरस्काराने सन्मान

  • उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा
  • उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : प्राचार्य डॉ. रावसाहेब पाटील, के. एन. भिसे महाविद्यालय, कुर्डुवाडी
  • उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार: प्रा. डॉ. विकास घुटे, संगणकशास्त्र संकुल, विद्यापीठ कॅम्पस
  • उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: श्री शशिकांत बनसोडे, कार्यालय अधिक्षक, हिराचंद नेमचंद कॉलेज, सोलापूर.
  • राजश्री शाहू महाराज पुरस्कार: सुलभा गोविंद बनसोडे, भूशास्त्र संकुल, विद्यापीठ कॅम्पस

Previous Post

टोकियो ऑलिम्पिक : एम्मा मॅककॉनने सात पदक जिंकली

Next Post

संकटांवर देखील मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली

Next Post
संकटांवर देखील मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली

संकटांवर देखील मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group