• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, August 17, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ईडब्ल्यूएसबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न – अशोक चव्हाण

by Yes News Marathi
December 27, 2020
in मुख्य बातमी
0
ईडब्ल्यूएसबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न – अशोक चव्हाण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षण घेतल्यास न्यायप्रविष्ट असलेल्या मराठा आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीचे प्रमुख आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत कुठेही संभ्रम नाही, मात्र काही जण संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा हेतुपरस्पर प्रयत्न करीत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

मराठा आरक्षणाची प्रक्रिया न्यायप्रविष्ट असताना ‘एसईबीसी’ उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून सरकारवर सडकून टीकाही होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी मत व्यक्त केले. चव्हाण म्हणाले, ‘जे पात्र उमेदवार आहेत, जे ‘एसईबीसी’मध्ये असून नियुक्त्या रखडल्या होत्या, त्यांनी सरकारकडे त्यांच्या नियुक्त्या कराव्यात, अशी विनंती केली आहे. ज्यामध्ये न्यायालयाचा अवमान होणार नाही; तसेच पर्याय निघेल त्यानुसार सकारात्मक पाऊल उचलले आहे. दोन हजार १४५ उमेदवारांना सरकारने ‘ईडब्ल्यूएस’चा मार्ग मोकळा केला आहे. ‘ईडब्ल्यूएस’चा कायदा केंद्र सरकारचा आहे. त्यासाठी या वर्गातून आरक्षण घेताना काही उत्पन्नाच्या अटी, शर्ती घातलेल्या आहेत. यातही ही सवलत वैकल्पिक ठेवली आहे. त्यामुळे ज्यांना सवलत घ्यायची आहे त्यांनी ती घ्यावी, ज्यांना ‘एसईबीसी’ची वाट पाहायची आहे त्यांनी वाट पाहावी.’ जास्तीत जास्त उमेदवारांना पर्यायी मार्गाने जाता येऊ शकते का हे तपासले जात आहे. यामध्येही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर हे सर्व आधारित राहणार आहे, असेदेखील चव्हाण म्हणाले.

Previous Post

सुशांतची हत्या की आत्महत्या ? CBIने जाहीर करावे: गृहमंत्री

Next Post

कोरोेनाचे नियम पाळत लोकमंगलचा विवाह सोहळा उत्साहात

Next Post
कोरोेनाचे नियम पाळत लोकमंगलचा विवाह सोहळा उत्साहात

कोरोेनाचे नियम पाळत लोकमंगलचा विवाह सोहळा उत्साहात

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group