येस न्युज मराठी नेटवर्क । टीआरपी घोटाळ्याचा तपास चांगल्या पद्धतीनं सुरु आहे. त्यात काही टीआरपी वाढल्याचा प्रकार घडल्याचं उघड झालं असून ही चौकशी वरिष्ठ अधिकारी करत आहेत. पुलवामा, बालाकोट हल्ला झाल्यानंतर ते चॅट वायरल झालेत ते गंभीर आहे. २६ फ्रेबुवारीला हल्ला झाला, २३ तारखेला त्याला माहिती कशी मिळाली. हा राष्ट्रीय सुरक्षितेचा प्रश्न आहे. केंद्र सरकारनं याची दखल घ्यायला हवी. डीटूएच दूरदर्शनचा वापर रिपब्लिक चॅनेलने फुकट केला. केंद्र सरकार आणि अर्णव गोस्वामींचे कसे संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे या सर्व बाबतीत तपास करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.