संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयानंतर निकम यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपणच मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
माध्यमांशी बोलताना निकम म्हणाले, माझ्या नियुक्तीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थांकडून सतत मागणी करत होते. कालही त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मी व्यथित झालो होतो. मी काल मुख्यमंत्र्यांना हा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे, असे कळवले. त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे मला आज समजले.
मस्साजोग ग्रामस्थांनी आता उपोषण सोडावे, असे मी आवाहन करतो. या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे, त्यामुळे आपण असे कुठलेही कृत्य करू नये, जेणेकरून प्रकृतीला त्रास होईल. तपासयंत्रणा जेव्हा आरोपपत्र सादर करतील, त्यावेळी आम्ही हा खटला तातडीने चालवण्यास घेऊ, असे आश्वासन देतो असे निकम म्हणाले