मुंबई : मुंबईचे पोलिस महासंचालक परमवीर सिंह यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचंही गृहमंत्री पद जाऊ शकतं, अशी माहिती दिली आहे. आज देशमुख यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आढळल्याचं प्रकरण ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांनी हाताळलं आहे, त्यावरुन पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. शरद पवार यांनी मागील काही दिवसात राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली आहेत.

काय म्हणाले अनिल देशमुख
मुकेश अंबानी याच्या घरासमोर स्पोटकं सापडल्याच्या प्रकरणाचा तपास आता एनआयए आणि एटीएस करत असून एनआयएला राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. त्यांच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्पोटकं सापडल्याच्या प्रकरणाच्या तपासावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरु होती. मुंबईच्या सध्याच्या घडामोडीवरही चर्चा झाल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं. ते म्हणाले की, “मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्पोटकं सापडली होती त्याचा तपास आता एनआयए आणि एटीएस चांगल्या प्रकारे करत आहेत. एनआयएच्या तपासाला राज्य सरकारच्या वतीनं संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही संरक्षण देण्यात येणार नाही.”