मुंबई : भारतात विविध ठिकाणी एअरटेलच्या ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा सध्या बंद असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. भारतातील विविध ठिकाणचे अनेक युजर्स एअरटेलच्या नेटवर्क आउटेजची ट्विटरवर तक्रार करत आहेत. तर बहुतांश युजर्स एअरटेलच्या ग्राहक सेवा केंद्रावर तक्रार करत आहेत. ऑनलाइन अहवाल सूचित करतात की, ही समस्या व्यापक असू शकते आणि एअरटेल मोबाइल इंटरनेट आणि कंपनीच्या ब्रॉडबँड तसेच वाय-फाय सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. ऑनलाइन अहवाल सूचित करतात की एअरटेल चे अॅप देखील या क्षणी काम करत नाही. दरम्यान, कंपनीने याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.