सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून उजनी ते सोलापूर या जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे मात्र हा भूसंपादनाचा मोठा अडथळा निर्माण झाल्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होणे अवघड आहे यापूर्वी भूसंपादनासाठी तसेच शेतकऱ्यांच्या पीक पाणी नुकसान भरपाईपोटी 50 कोटी लागतील असा आराखडा केला होता मात्र अचानकच ही रक्कम आता 80 कोटीने वाढविण्यात आली आहे त्यामुळे एवढे पैसे महापालिकेने द्यायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे भूसंपादन रखडणार आहे परिणामी काम देखील थांबणार आहे.