• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

29 ऑगस्टला समाजबांधवांसह मुंबईत होणार आंदोलन… मनोज जरांगेची घोषणा….

by Yes News Marathi
June 29, 2025
in इतर घडामोडी
0
29 ऑगस्टला समाजबांधवांसह मुंबईत होणार आंदोलन… मनोज जरांगेची घोषणा….
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रणभूमीची अशी तयारी करा की, विजय आपल्याला मिळवायचा आहे

मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज आंतरवाली सराटीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा आंदोलक उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची रुपरेषा जाहीर केली. मराठा आरक्षणासाठी आता वाशीबिशी काही नाही तर, थेट मंत्रालय गाठायचे असल्याचे ते म्हणाले. मनोज जरांगेंनी सरकारकडे मराठा कुणबी एक असल्याचा जीआर काढण्यासह सात मागण्या केल्या आहेत.

तुम्हा सगळ्यांना मानावे लागेल. आपल्याला सतत नावे ठेवली गेली, फूट पाडण्याचे प्रयत्न केले. पण, तुम्ही कोणी फुटला नाहीत. आता आपल्याला रणभूमीत लढायचे असून विजयही मिळवायचा आहे. रणभूमीची अशी तयारी करा की, विजय आपल्याला मिळवायचा आहे. आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, असे जरांगे यांनी म्हटले. आपल्याला मैदान गाजवायचे असून गुलाल पण आपल्याच अंगावर घ्यायचा आहे. दोन वर्षांपासून मराठा आंदोलनासाठी लढत आहे. ही अंतिम लढाई मराठ्यांनी पार करायची, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.

फडणवीसांचे आम्ही शत्रू नाही. पण, मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन वर्षांचा वेळ दिला. आता आमच्यातील संयम संपला आहे. आता ओबीसीमधूनच आरक्षण घेणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. आता वाशी बिशी नाही, सरळ मुंबईत जायचे. मुंबईत शांततेत आंदोलन होणार असून एकाही मराठ्याला काठी लागली, तर मुंबईतील रस्ते सुद्धा मोकळे राहणार नाहीत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

आता विषय हक्काचा आहे. 58 लाख नोंदी आणि 4 कोटी मराठे आरक्षणात गेले आहेत. गावागावातून तयारी करा, जायचे असून 27 ऑगस्ट रोजी आंतरवालीतून निघायचे आहे. पावसाचे दिवस असून मला तुम्ही मुंबईत सोडायला या, पुढचे मी पाहतो. आता अशी संधी पुन्हा मिळणार नसून विजयाची चाहूल लागली आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

Previous Post

सोलापूर नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष माणिक गोयल यांचे निधन

Next Post

प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने गजानन महाराज पालखी सोहळ्यतील वारकरी व भाविकांना केळी वाटप…

Next Post
प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने गजानन महाराज पालखी सोहळ्यतील वारकरी व भाविकांना केळी वाटप…

प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने गजानन महाराज पालखी सोहळ्यतील वारकरी व भाविकांना केळी वाटप…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Join WhatsApp Group