माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, मध्य रेल्वे अंतर्गत रुपये १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन (१.७३ किमी) प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
मल्टी ट्रॅकिंग/फ्लायओव्हर/बायपास लाईन क्षमता वाढीअंतर्गत प्रस्तावित या धोरणात्मक उपक्रमाचे उद्दिष्ट मिरज जंक्शनवरील रेल्वे परिचालन लक्षणीयरीत्या सुलभ करणे आहे, जे मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर आणि मिरज-लोंढा सारख्या मार्गांना जोडणारा एक प्रमुख इंटरचेंज पॉइंट आहे.
सध्या, कुर्डुवाडी किंवा हुब्बल्लि येथून येणारे आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या गाड्या, इंजिन किंवा ब्रेकव्हॅन रिव्हर्स करताना सरासरी १२० मिनिटे मिरज येथे अडकून पडतात. प्रस्तावित कॉर्ड लाईनमुळे या परिचालन विलंबांना दूर केले जाईल, ज्यामुळे नेटवर्क कार्यक्षमता सुधारेल.
पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि या प्रदेशात मालवाहतूक आणि प्रवासी गाड्यांचे कार्यक्षमतेने संचालन करण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे प्रवाशांची मिरज ते कोल्हापूर जलद प्रवासाची दीर्घकाळापासून असलेली मागणी पूर्ण होणार आहे.