छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे संभाजी आरमारच्या वतीने संभू प्रेरणा रॅली आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक अशी पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांना अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ढोली-बाजाच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज – संभाजी महाराजांच्या जयघोषात जल्लोषपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला डोक्यावर भगवी टोपी परिधान करून हातात भगवे झेंडे घेऊन संभाजी आरमारचे असंख्य मावळे, माता-भगिनी, दिव्यांग बांधव या रॅलीत सहभागी झाले होते. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी छत्रपती संभाजी महाराज ही प्रतिकूल परिस्थितीशी चिवटपणे लढण्याची अखंड प्रेरणा असून संभाजी आरमारदेखील या प्रेरणेच्या बळावरच मागील १७ वर्षांपासून यशस्वी वाटचाल करत असून यापुढेही हा शिव-शंभू विचारांचा जागर आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठी संभाजी आरमार काम करत राहणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष मतीन बागवान, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, साहहरप्रमुख सागर ढगे, शिक्षक संघटना प्रमुख अजिंक्य पाटील, जिल्हा संघटक अमित कदम, उपजिल्हाप्रमुख सागर संगवे, उपशहरप्रमुख राज जगताप, दिव्यांग संघटना प्रमुख वासुदेव होणकोंबडे, महिला आघाडीच्या मनीषा महाडिक, विभागप्रमुख मल्लिकार्जुन पोतदार, गुरुनाथ निंबाळे, प्रा. मल्लिकार्जुन परळकर, तुकाराम जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

