ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला केल्यानंतर भारताला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कंधार आयसी-८१४ एअर इंडियाच्या विमान अपहरण प्रकरणाचा सूत्रधार रौफ अझहर एका हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. बुधवारी, रौफ अझहर जखमी अवस्थेत ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचे नेतृत्व करताना दिसला होता.
पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने पुन्हा एकदा सांगितले होते की ते दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारतील. रौफचा मृत्यू हे याचे आणखी एक उदाहरण आहे. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने यापूर्वीही हवाई हल्ल्यांचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. रौफच्या हत्येनंतर मसूद अझहरलाही मारले जाऊ शकते अशी दाट शक्यता आता वर्तविली जात आहे.