वक्फ सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आज दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. या कायद्यातील नव्या दोन तरतुदींना अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. हा केंद्र सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. अशातच वक्फ सुधारणा विधेयकावर काम करणाऱ्या जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांचे महत्वाचे वक्तव्य आले आहे.
वक्फ सुधारणा कायद्यात एक जरी चूक आढळली तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देईन असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांनी याचिकेद्वारे वक्फ कायद्यातील तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत सरकारचं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे.