सोलापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर ई-चलानव्दारे कारवाई करण्यात येते. ज्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन धा दंडाची/तडजोडीची तडजोड रक्कम अद्याप पावेतो भरलेली नव्हती अशा वाहन धारकांना SMS व्दारे नोटीस/सुचना देण्यात आले होते. त्याचप्रमाणे मुदतीत दंड भरणा न केलेले एकूण १०,००० वाहन चालकांना समन्स काढण्यात आलेले होते व समन्स निघूनही दंड न भरलेल्या ७०० वाहनचालकांचे नावे वॉरंट काढण्यात आले होते. त्यांना २२/०३/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर येथे लोक अदालत मध्ये हजर राहणे बाबत व तडजोड रक्कम भरणा करणेबाबत आवाहान करण्यात आलेले होते.
त्यानुसार ४०१० वाहन चालकांनी स्वतःहून दंडाची रक्कमेचा भरणा केला आहे आणि अशा वाहनधारकांकडून ४०,६१,५००/- (अक्षरी चाळीस लाख एकसष्ठ हजार पाचशे रुपये) इतकी रक्कम भरणा करुन घेण्यात आली. नागरिकांची गैरसोय होवू नये व तात्काळ रक्कमेचा भरणा होण्याकरीता शहर वाहतूक पोलीस शाखेकडून पोलीस अंमलदार यांना अद्यावत मशिनसह सदर ठिकाणी उपस्थित ठेवण्यात आलेने त्यामुळे बरीच मोठी सोय झाली.
समन्स स्विकारुन देखील लोकअदालत प्रक्रियेला प्रतिसाद दिला नाही. अशा वाहनचालकांना वॉरंट काढण्यात येणार आहे. वाहनचालकांनी त्यांच्या वाहनांवर असलेला दंड त्वरीत भरावा. जर दंड भरला नाही तर अशा वाहन चालकांचे खटल मा. न्यायालयात पाठविले जातील व आपणास न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. तरी आपण आपल्या वाहनावरील दंड त्वरीत नजिकच्या ट्राफिक कार्यालयात तसेच कोणत्याही ट्राफिक अंमलदाराकेड कुठेही भरावा व न्यायालयीन प्रक्रियेतून वाचावे असे आवाहन करण्यात येत आहे.