• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, July 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लातूर जिल्ह्यातील तब्बल 25 हजार 136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले….

by Yes News Marathi
January 31, 2025
in इतर घडामोडी
0
लातूर जिल्ह्यातील तब्बल 25 हजार 136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले….
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील  निकषात अद्याप एकही बदल केलेल नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे. तसेच, ज्या लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा झाले, ते पैसे सरकार परत घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडक्या बहि‍णींना मिळणार लाभ मिळतच राहणार असून ज्या बहि‍णींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यानुसार, शासन स्तरावर आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची स्क्रुीटीनी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानुसार, लातूर जिल्ह्यातील 25 हजार लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद झाल्याची माहिती स्वत: महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लाकड्या बहि‍णींना योजनेतून दे धक्का करण्यात येत असल्याचे दिसून येते. 

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा आला होता. लातूर जिल्ह्यातील 5 लाखाहून अधिक महिलांना योजनेचा निधीही मिळाला. पण, दुसरीकडे निवडणुकांच्या निकालानंतर या योजनेत पारदर्शकता आणली जात आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील तब्बल 25 हजार 136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. 

लाडक्या बहि‍णींना महिन्यासाठी दीड हजार रुपये कधी खात्यामध्ये पडणार याची उत्सुकता सातत्याने असते. आतापर्यंत 7 महिन्यांचे दीड हजार प्रमाणे पैसेही खात्यावर जमा झाले आहेत. पण काही ठिकाणी अनियमिता आणि कागदपत्रांमध्ये छेडछाड असे प्रकार समोर येऊ लागले आहेत. तर काही अर्जामध्ये कागदपत्रांची पूर्तताच झाली नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील 25 हजार 136 अर्ज हे रद्द करण्यात आल्याचे जिल्हा परिषद विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामध्ये खोटी कागदपत्रे सादर करणे, उत्पन्न जास्त असणे यासारख्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Previous Post

जीबीएसचा आणखी एक बळी… सोलापुरात एक, पुण्यात दोन तर पिंपरी चिंचवडमध्ये एक मृत्यू…

Next Post

तृतीयपंथीयांविषयी प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना हवी: शमीबा पाटील

Next Post
तृतीयपंथीयांविषयी प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना हवी: शमीबा पाटील

तृतीयपंथीयांविषयी प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना हवी: शमीबा पाटील

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group