येशू ख्रिस्ताचे जन्म या प्रकारे झाला. पवित्र शास्त्र आपल्याला या प्रमाणे सांगतात की स्वर्गातील परमेश्वराचे देवदूत मरियेकडे येऊन म्हणाला. “हे कृपापावलेली कन्या प्रभू तूजबरोबर आहे.” स्त्रीयामध्ये तू धन्य आहे “कारण देवाची कृपा तूजवर झाले आहे.” येशूची आई मरीया पवित्र आत्म्यापासून गर्भ राहिला. पुत्र प्रसवेल आणि तो त्याचे नांव येशू ठेव कारण तोच आपल्या लोंकाना त्याच्या पापापासून तारिले. हे सर्वयासाठी झाले की, प्रभू ने संदेष्ठाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. येशू ख्रिस्ताच्या हजारोवर्षापूर्वी अनेक संदेष्ठांनी येशू ख्रिस्ताविषयी संदेश दिला. यिर्मया, मीका, होशे संदेष्ठा या प्रमाणे प्रत्येक संदेष्ठाने येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी संदेश दिला. याचप्रमाणे यशया संदेष्ठांनी संदेश दिला पवित्रशास्त्र वचनानुसार यशया ९-६ कारण आम्हासाठी बाळ जन्माल आहे. आम्हास पुत्र दिला आहे. त्यांच्या खांद्यावर सत्ता राहिला. त्यांना अदभुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता शांती अधिपती म्हणतात. येशू ख्रिस्ताला शांतीचा राजा असे नाव देण्यात आले. याकरिता स्वर्गीय पिता त्यांने येशू ख्रिस्ताला पृथ्वीवर पाठवीले. तो शांतीचा परमेश्वर आहे.
आज जगातील लोक शांतीच्या शोधात आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भर्गिनी आपण या जगामाध्ये अश्रुंनी आणि आपल्याभोवती अनेक संकट, क्लेश रोजचा
आपल्या जीवनामध्ये असतात. त्यांच्याबरोबर आपण जीवन जगत आहोत. मनुष्य पाप करून परमेश्वराच्या शांतीपासून लांब झाले. परमेश्वराची महिमा, सौंदर्य, शांती, समाधान या सर्वापासून लांब झाले जेव्हा मुनष्य पाप करतात त्या पांपाच्या द्वारे मनुष्य नरकात जातात. म्हणुन पिता परमेश्वर आपल्यावर प्रेम दया व कृपा दाखवून आपल्याला परमेश्वराच्या शांतीत तारण मिळण्यासाठी प्रभू येशू खिस्ताचे जन्म सर्व मुन्यांत त्यांच्या पाप, शाप व सर्व रोग यांच्यापासून मुक्त करण्यासाठी झाले.
एक दिवस येशू परूशीच्या घरात भोजन करण्यास गेले. तो त्यांच्या घरात जेवायला बसला अचानक तेथे पापी स्त्रि तेल एका पात्रात घेवून आली. त्यांच्या पायाना आश्रुंने भिजवत आणि आपल्या डोक्याच्या केसाने पुसत होती आणि त्यांच्या पायांना तेलाने चोळीत होती. येशू ख्रिस्ताने तिचे अंतकरण पाहिले.
पवित्रशास्त्र सांगते मनुष्य बाह्यस्वरूप पाहतो. परंतु परमेश्वराची दृष्टी अंतकरणावर असते. तेव्हा त्यांने त्या स्त्रीला म्हटले “मुली तुझी पापे क्षमा झाली” तुझ्या विश्वासाने तुला तारीले सुखरूप जा. पवित्र शास्त्रात लूक ८-४३ वचनामध्ये लिहल्या प्रमाणे एक रक्तस्त्राव स्त्री होती कोणालाही बरी करता न आलेली अशी स्त्री येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्त्राव थांबला पण येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला ?” त्याचे सोबती म्हणाले “गुरूजी, लोकसमुदाय तुम्हांला दाही करून चेंगरत आहेत” पण येशू म्हणाला “कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे” मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणाकरता त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तेव्हा तो तिला म्हणाला “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा.” या प्रमाणे येशू खिस्ताच्या द्वारे सर्व पाप, शाप, रोग हे यानुसार मुक्त होते. येशू ख्रिस्ताकडे येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला शांती समाधान, सदासर्वकलिक जीवन मिळतो.