सोलापूर – आविष्कार च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळी वर नवकल्पना सादर करणेची संधी मिळणार असल्याचे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
सिंहगड संस्थेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर, प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर व सर फाउंडेशन सोलापूर यायचे संयुक्त विद्यमाने आयोजित अविष्कार नवकल्पना असणाऱ्या बाल……सर्जकांचा, चिल्ड्रेन इनोव्हेशन्स या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणेत आले होते. प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्रिसिजन फाउंडेशन च्या सुहासिनी शहा, सर फाऊंडेशन चे समन्वयक बाळासाहेब वाघ, सिध्दराम माशाले, यांचे सह जिल्ह्यातील केंद्र प्रमुख उपस्थित होते.
शिक्षकांचे नावात “ जी”शब्द – सिईओ स्वामी
शिक्षकांचे स्थान समाजात अनन्य साधारण आहे. गुरूजी म्हणून मुले व लोक हात मारतात. गुरूजी मध्ये जी शब्द आहे. सिईओंजी म्हणत नाहीत परंतू गुरूजी म्हणतात. आविष्कार हे विचारपीठ आहे. देशपातळीवर या माध्यमातून संधी आहे. चांगले उपक्रम राबवित आहात. स्वच्छ सुंदर शाळेसाठी दिलेले शिक्षक व शाळांनी दिलेले योगदान मी कधीच विसरणार नाही. परंतू जे सहभागी झाले नाहीत ते पण माझे ध्यानात आहेत. शाळेचा चेहरा मोहोरा बदलला आता विद्यार्थ्याचे गुणवत्ता वाढी साठी आपण आविष्कार च्या माध्यमातून करीत असलेले प्रयत्न महत्वपुर्ण आहेत. असेही सिईओ स्वामी यांनी सांगितले.
पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगा
माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ, सुंदर शाळे बरोबर क्लीन अॅन्ड ग्रीन शाळा करा. स्वच्छ व हरीत शाळा करणे साठी माझी वसुंधरा अभियान राबवा. स्वच्छ तोटी चळवळ सुरू ठेवा. लोकांचे स्वच्छ सर्वेक्षण साठी मते जाणून घ्या. पालकांना स्वच्छतेचे उपक्रम समजावून सांगा. स्वच्छतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहणेस मदत होते. अनेक शाळां मघ्ये सांडपाणी वर परसबागा तयार केले आहेत. शाळेत जमा होणारे कचराचे खत केले जात आहे. पर्यावरणाशी नाते जोडा.
स्वच्छ चंद्रभागा मोहिमेत सहभागी व्हा
नमामी चंद्रभागा मध्ये जिल्ह्यातील १८० नदीकाठची गावे या प्रकल्पा मध्ये घेतली आहेत. पर्यावरण स्वच्छ ठेवायचे असेल तर नद्या स्वच्छ ठेवावे लागतील. मुलांना पर्यावरण व नदीची स्वच्छता याबाबत माहिती द्या ते घरी जाऊन पालकांना सांगतील. स्वच्छतेचा आग्रह धरतील.
सिईओ दिलीप स्वामी यांनी बोलताना सांगितले. या प्रसंगी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत माहिती व त्याची परिणामकारकता याबाबत उद्बोधन केले सुरू असलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर , मानसिकतेवर चांगला परिणाम होत असल्याचे प्राचार्य शंकर नवले यांनी सांगितले.