मुंबई : मतदानकार्डला आधारकार्ड लिंक मंजूर करण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मंजूर झाला आहे. माशिवसेना नेते विनायक राऊत यांनी मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास आमचा विरोध असल्याचं स्पष्ट केलं आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदानकार्डाला आधारकार्ड लिंक करायला नको. यामागे केंद्र सरकारचा कुठला तरी कुटील डाव असू शकतो, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
कदम-परब प्रकरणात उद्धव ठाकरे लक्ष घालतील
भाजपेत्तर राज्यात केंद्राकडून त्रास दिला जातोय असंही त्यांनी सांगितलं. तसेच सिंधुदुर्गात चारही नगरपरिषदेत युती यशस्वी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील गटबाजीत उद्धव ठाकरे लक्ष घालतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.