मुंबई : साकीनाकायेथे घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निर्भया पथक स्थापन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.
साकीनाका परिसरातील पाशवी बलात्काराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सक्रिय होत महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखायला सुरुवात केलीय. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये आता महिला सुरक्षा पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकाला निर्भया पथक असं नाव देण्यात यावं अशी सूचना मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केलीय.