• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, July 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महारेराच्या तपासणीत राज्यातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्प निघाले दिवाळखोरीत?

by Yes News Marathi
April 27, 2023
in मुख्य बातमी
0
महारेराच्या तपासणीत राज्यातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्प निघाले दिवाळखोरीत?
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : ग्राहकांची फसवणूक टाळण्याच्या उद्देशाने महारेराकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून ‘राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणा’च्या (एनसीएलटी) वेबसाइटवरून छाननी करण्यात आली. त्यात राज्यातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्पांवर दिवाळखोरीचे काळे ढग जमा असल्याचे आढळून आले. त्यातील ११५ प्रकल्प सुरू असून १९३ रखडलेले आहेत. या प्रकल्पांबाबतची माहिती महारेराने तातडीने वेबसाइटवर उपलब्ध केली असून त्यात मुंबई महानगरातील २३३, पुण्यातील ६३, अहमदनगरमधील पाच, सोलापूरमधील चार आणि रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

मुंबईसह राज्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या खरेदीदारांच्या हितासाठी महारेराकडून विविध मार्ग अवलंबले जात आहेत. महारेराकडून संबंधित गृहप्रकल्पांच्या वेबसाइटप्रमाणेच इतर मार्गातूनही प्रकल्पस्थिती समजून घेतली जात आहे. त्याअंतर्गत महारेराने ‘एनसीएलटी’च्या वेबसाइटवरून छाननी केली. त्यात महारेराकडे नोंदणीकृत असलेले ३०८ प्रकल्प हे नादारी आणि दिवाळखोरीच्या छायेत असलेले दिसले. बँका, वित्तीय संस्था, पतपुरवठा करणाऱ्यांनी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामार्फत ३०८ प्रकल्पांवर दिवाळखोरीची कारवाई सुरू केली आहे. या ३०८ प्रकल्पांपैकी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची संख्या ११५ आहे. त्यापैकी ३२ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. १९३ प्रकल्प बंद पडले असून यातील १५० प्रकल्पांतही ५० टक्के पेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. अन्य सुरू असलेल्या ८३ आणि बंद पडलेल्या ४३ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी नोंदणी झाली आहे.

३०८ प्रकल्पांपैकी ११५ हे सुरू असलेले प्रकल्प आहेत. त्यात ठाणे भागातील ५०, मुंबई उपनगर ३१ मुंबई शहर १० पुणे आणि रायगड प्रत्येकी ८, अहमदनगर ५ पालघर २ आणि सोलापूरच्या एका प्रकल्पाच समावेश आहे. बंद प्रकल्पांची संख्या १९३ असून यात पुणे ५५, मुंबई उपनगर ५२, ठाणे ५०, पालघर १७ रायगड ७, मुंबई ५, सोलापूर ३, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

Previous Post

अभिनेत्री जान्हवी कपूरचा सुपर ग्लॅम लूक!

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा

Next Post
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group