• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, July 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सरकारचा आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार – राजेश टोपे

by Yes News Marathi
March 23, 2020
in मुख्य बातमी
0
सरकारचा आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार – राजेश टोपे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोशल डिस्टंसिंग मेंटेन करणं आवश्यक आहे. लोकांनी गर्दी करू नये अशी विनंती केली जात आहे. जनतेनं असं होऊ देऊ नये, तरीही कोणी न ऐकल्यास त्यांच्यावर नाईलाजानं कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यापुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देणार, असल्याचंही ते म्हणाले.

लोकांनी रक्तदान करावं. राज्यात केवळ १०-१५ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. फक्त रक्त देण्याच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. जो रक्ताचा साठा कमी झाला आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करावा, असं टोपे यावेळी म्हणाले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचचली जात आहेत. पोलीस आणि अन्य विभाग काम करतायत. आकडा वाढला असला तरी घाबरण्याचं कारण नाही. अधीच्या लोकांना डिस्चार्ज करण्याची किंवा मॉनिटरींग करण्याची कार्यवाही करण्यात येईल. ८९ जणांपैकी मुंबईचा आणि पुण्याचा प्रत्येकी एक जण आयसीयूमध्ये आहे. सरकारला सहकार्य करणं ही काळाची गरज आहे. वडिलधाऱ्यांची आणि आजारी लोकांची काळजी करावी, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल त्यांनी अधिकची काळजी घ्यावी, असं मत आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

आमचं संपूर्ण लक्ष चाचणी केंद्र वाढवण्यावर आहे. सध्या सहा चाचणी केंद्र सुरू आहेत. पूर्ण क्षमतेने ते चालावे याकडे लक्ष आहे. मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर डॉ. तात्याराव लहाने यांच्याशीही संपर्क झाला. खासगी ठिकाणीही चाचणी केंद्र सुरू करण्यावर विचार सुरू आहे. सध्या आपण राज्याच्या काही सीमा आपण सील करत आहोत. पोलिसांना तसं सांगण्यात आलं आहे. सध्या गोवा सीमा सील करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.

Previous Post

तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांना पॅरोलवर सोडा… सुप्रीम कोर्टाचे आदेश

Next Post

….नाही तर संपूर्ण राज्यात संचारबंदीचाही विचार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
….नाही तर संपूर्ण राज्यात संचारबंदीचाही विचार – उपमुख्यमंत्री अजित पवार

....नाही तर संपूर्ण राज्यात संचारबंदीचाही विचार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group