• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 1, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त, रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात

by Yes News Marathi
March 27, 2020
in मुख्य बातमी
0
गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त, रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवप रेपो दरात कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली. तसंच नागरिकांनी संयम बाळगावा, असंही त्यांनी नमूद केलं. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीर रिझर्व्ह बँकेकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली.

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.

करोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता आहे. करोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचे ते म्हणाले. याव्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेनं सीआरआर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • तीन महिने ईएमआय स्थगित करा
    कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिला आहे. असं झाल्यास सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Previous Post

संचारबंदीच्या काळात सामान्यांच्या अडचणी दूर कराव्यात : रणजितसिंह मोहिते-पाटील

Next Post

पोलीसदेखील एक माणूस, त्यांच्यावर किती ताण देणार : जयंत पाटील

Next Post
पोलीसदेखील एक माणूस, त्यांच्यावर किती ताण देणार : जयंत पाटील

पोलीसदेखील एक माणूस, त्यांच्यावर किती ताण देणार : जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group