हाथरस : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांवर घणाघाती टीका केली आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. त्यावरून उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी सरकार वादात सापडलं होतं. याचं संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलंय की, ‘लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) व त्यांच्या पोलिसांचं म्हणणं आहे की, कुणीही बलात्कार केला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ती कुणीही नव्हती’, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.