• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 4, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर इथून पुढे अभिषेक आणि पूजा होणार नाही

by admin
December 26, 2019
in इतर घडामोडी
0
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर इथून पुढे अभिषेक आणि पूजा होणार नाही
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर इथून पुढे अभिषेक आणि पूजा होणार नाहीत. त्याऐवजी अभिषेक आणि पूजा आता चल पादुकांवर केल्या जाणार आहेत. विश्वस्तांच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयानंतर आता वाद होण्याची चिन्ह आहेत. समाधीची होणारी झीज आणि भाविकांची होणारी गैरसोय यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. चार ते पाच भाविकांच्या अभिषेक आणि पूजेसाठी हजारो भाविक आणि वारकऱ्यांना वेठीस धरणं चुकीचं आहे. तसेच अभिषेक करताना वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे समाधीची झीज होत असल्याचं पुरातत्व विभागाने पाहणी करून आम्हाला अहवाल दिला आहे. त्यानुसार विश्वस्तांच्या बैठकीत ठराव झाला आहे, अशी माहिती मुख्य विश्वस्त विकास ढगे, विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त अजित कुलकर्णी यांनी दिली आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येत आहे. या अभिषेकाचं स्वरूप बदलून चल पादुकांचे अभिषेक केले जाणार आहेत. पण पुजाऱ्यांची याला संमती नसल्याने यावरून वाद होण्याची शक्यता आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या विश्वस्त समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला.

दरम्यान या निर्णयाला काही पुजारी आणि काही वारकऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विश्वस्त कमिटीने आळंदी पोलीस स्थानकात देखील याबाबत सुरक्षा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. समाधीवर अभिषेक आणि पूजा पद्धतीत बदल करण्यात आला असून एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाची अमलबजावणी उद्या, २७ तारखेपासून करण्यात येणार आहे. या निर्णयाला काही व्यक्तींकडून अडथळा, अटकाव आणला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी विश्वस्त कमिटीने केली आहे.

Previous Post

सोलापूर विद्यापीठ / खेळामध्ये देशाला आघाडीवर नेण्यासाठी युवा ऊर्जा खर्ची घाला: राज्यपाल कोश्यारी

Next Post

प्रवासी रेल्वेगाडय़ांचे भाडे वाढवण्याबाबत विचार सुरू

Next Post

प्रवासी रेल्वेगाडय़ांचे भाडे वाढवण्याबाबत विचार सुरू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group